Pune City News :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या 130 कोटी नागरिकांना “जनता कर्फ्यूचं” आवाहन केलं होत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत.
देशावर ओढवलेल्या कोरोना साथीच्या संकटातही अहोरात्र सेवा देत असलेल्या अत्यावश्यक सेवांमधील सर्व कर्मचाऱ्यांना आज अवघ्या देशाने सलाम केला आहे.
जनता कर्फ्यूदरम्यान सायंकाळी ठिक पाच वाजता घराच्या खिडकीत, दारात येऊन, गच्चीवर जाऊन लोकांनी शंख, टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून जिगरबाज कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ दिले.
अवघ्या देशात एकाचवेळी घंटा आणि थाळीनाद घुमला. तसेच कोरोनाचा सामना करणाऱ्या, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,कडून टाळ्या वाजवून आभार व्यक्त करण्यात आलेत.
next post

