Pune City News
पुणे

शेतकरी संघटनांचा अंबानी इस्टेटवर मोर्चा धडकणार

२६ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ३० लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांना श्रद्धांजली म्हणून २० डिसेंबरला सायंकाळी राज्यातील गावागावात मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

मुबंईत उपजिल्हाधिकारी कार्यालयापासून बिकेसीतील अंबानी इस्टेटवर २२ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.

पुण्यात पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बाबा आढावसह आदी. उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले :

हे आंदोलन पंजाब,हरियाणा मधील शेतकऱ्यांच आंदोलन नाही तर सर्व देशातील शेतकऱ्यांच आंदोलन आहे.

व्यापक शेतकरी आंदोलन या अगोदर झाली नाहीत. आता ही लढाई काही राज्याची नाही, तर सर्व शेतकऱ्यांचे आहे. हे कायदे शेतकरी विरोधी आहेत.

हमीभाव कायदा बंधनकारक करावा, बाजारात हमीभाव पेक्ष्या कमी दराने शेतीमाल खरेदी करावा अशी मागणी आहे.

दरम्यान, या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, शेतकरी कामगार पक्ष व लोक संघर्ष मोर्चा या मुबंई मोर्चात सहभागी होणार आहेत.

Related posts

छत्रपती. शिवाजी महाराजांना अजित पवारांचे वंदन

Vishal Khandagale

सिद्धार्थ नगर येथे उभारण्यात येत असलेल्या गृह निर्माण प्रकल्पात पुढील दोन वर्षात पक्की घरे देण्यात येतील – मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके

Vishal Khandagale

पोलीस नाईक संजय बनसोडे यांची आत्महत्या !

Vishal Khandagale

Leave a Comment