मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्याची विनंती अर्ज दाखल केला आहे. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असल्याचे बोललं जात आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्या वतीने आज विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.
नुकतंच वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण समितीचे प्रमुख अशोक चव्हाण, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायलयाने विनंती अर्ज दाखल केला आहे. स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया आहे. यावर पुढे सुनावणी होईल.

