Pune City News
महाराष्ट्र

कायदा अपंग: फाशीमुळे भावना संपुष्टात

Pune City News:- निर्भयाच्या गुन्हेगारांना उशिरा फाशीची अंमलबजावणी झाली. सामान्यांना यातून आनंद, तर गुन्हेगारांना कायदा अपंग आहे, तो काहीही करू शकणार नाही अशी भावना होती. परंतु फाशीनंतर गुन्हेगार प्रवृत्तींची ही भावना संपुष्टात आली, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली. या आरोपी जे हतखंडे वापरले ते चुकीचे आहे. परंतु ते कायद्याच्या दृष्टीने योग्य ती आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.सर्वोच्च न्यायालयात फाशीच्या निकालात किती वेळा याचिका दाखल केली पाहिजे, यावर याचिका दाखल आहे. तो निकाल प्रलंबित आहे. राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज किती वेळा करता येतो याचे कुठेही उल्लेख नाही, त्याचाही अभ्यास आता करण्याची वेळ आली आहे. या निर्भयातील आरोपींनी कायद्याचा ज्यापद्धतीने वापर केला आहे. त्यावरून न्यायपालिका आणि सरकारने यापुढील गुन्ह्यात विचार करावा लागणार आहे. कायद्याची भीती वाटली पाहिजे, असा कायदा असावा.

Related posts

राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे

Vishal Khandagale

शाळा,महाविद्यालय व गर्दीची सर्व ठिकाण बंद

Vishal Khandagale

मंत्रिमंडळ बैठकितील निर्णय!

Vishal Khandagale

Leave a Comment