काठ्या हातात देऊन सैनिकांना सीमेवर पाठवायला सीमा म्हणजे आरएसएसची शाखा आहे का ? असा खडा सवाल काँग्रेसचे खा. हुसेन दलवाई यांनी मोदी सरकारला केला आहे.
खा. दलवाई म्हणाले :
▪️ तुम्ही लाठी घेऊन सैनिकांना पाठवता का ? ती काय आरएसएसची शाखा आहे का ? तुम्हाला तसे वाटत असेल सैनिकांऐवजी आरएसएसच्या लोकांना सीमेवर पाठवा.
▪️ पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावून चांगले केले असून हे आधीच व्हायला हवे होते. मात्र उशिरा का होईना त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे.
▪️ गलवान खोऱ्यात नेमके काय घडले ? चिनी सैनिकांनी किती घुसखोरी केली आहे, याची माहिती मिळायला हवी.
दरम्यान, गलवानमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली असून चिनी सैनिक बरेच आतमध्ये घुसल्याच्या दावा त्यांनी केला आहे.

