भारतातील सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून, परीक्षेचे नवीन वेळापत्रक 31 मार्च नंतरच ठरवण्यात येतील असेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सीबीएसईला यासंदर्भातील निर्देश दिले होते. परीक्षा महत्वाच्या असल्या तरी विद्यार्थी, शिक्षकांची सुरक्षा त्यापेक्षा महत्त्वाची आहे, असा पवित्रा मंत्रालयाने घेतला होता.दरम्यान, सरकारच्या निर्देशांवर मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली त्यानंतर मंडळाने बुधवारी हा निर्णय जाहीर केला.
previous post
next post

