मध्य प्रदेशात जे चालू आहे तसं काही महाराष्ट्रात होणार नाही. काळजी नसावी . महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृवातले महाविकासआघाडी चे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, हा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
आज ते राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी वार्तालाप करताना. मध्य प्रदेशमधल्या घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं.
मध्य प्रदेशमधलं सरकार अजून पाडले गेलेलं नाहीये. कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांचा विश्वास आहे. ते चमत्कार करू शकतात अस लोकांना वाटतं. आपण बघूया दोन दिवस काय होतं, असंही ते म्हणाले.

