Pune City News :- राज्यात आत्तापर्यंत पाच हजार जणांना विलगीकरण केले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.राज्यातील मुंबईत सर्वाधिक म्हणजे 162 करोनाबाधित असून सुदैवाने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कॉरेंटाईन करण्यात आले आहे.
करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले असून संचारबंदीही केली आहे, परंतु करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 हजार जण करोनाबाधितांच्या संपर्कात आले आहेत. हे सर्व जण होम कॉरेंटाईन असून त्यांचीही चाचणी केली जाणार आहे.
previous post

