राज्यातील शाळा आणि महाविद्यालयामधील नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार असल्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.
▪️ यंदाच्या वर्षी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नसून त्यांना सरसकट उत्तीर्ण करणार आहेत.
▪️ राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्य शिक्षण विभागाने घेतला आहे.
▪️ दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

