मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 8.30 वाजता सोशल मीडियावरुन महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं.
काय म्हणाले मुख्यमंत्री? :
● राज्यात उद्या 14 एप्रिलपासून कलम 144 लागू होणार.
● सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा चालू राहतील.
● रस्त्यावर खाद्यविक्रीला परवानगी राहणार
● लोकल ट्रेन आणि बस सेवा अत्यावश्यक सेवेसाठी फक्त सुरू राहणार.
● पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक होतेय तिथे सूट असेल. तर हवाई मार्गे ऑक्सिजन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्राकडे मागणी.
● राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 1 किलो तांदूळ 1 महिन्यासाठी मोफत.
● नोंद केलेले लाभार्थी आहेत, ते 7 कोटी आहेत. या सर्वांना 1 महिना 3 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ मोफत देणार.
● शिवभोजन थाळी 10 रुपयात देत होतो. ही योजना कोव्हिड आल्यानंतर 5 रुपयात केली. आता शिवभोजन थाळ्या गोरगरिबांना मोफत.

