Pune City News:- न्यायासाठी संघर्ष खूप करावा लागला. या न्यायासाठी ज्यांनी ज्यांनी पाठबळ दिले, त्या सर्वांचे आभार, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या वडिलांनी दिली. मुला-मुलींमध्ये फरक नको आहे. वडील म्हणून प्रत्येकाने मुलींबाबतचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. न्याय घेताना त्यात अनेक पळवाटा आहे. परंतु लढा प्रामाणिक असल्यास त्याला न्याय मिळतो. आम्ही सत्य होतो, त्यामुळे न्याय मिळाला.
न्यायासाठी कायद्याचा प्रत्येक दरवाजा ठोठावला. दोन्ही बाजूने कायद्याचा धुराळा उडाला. पण, शेवटी न्याय मिळाला. समाजातील नराधमांना
या फाशीमुळे चांगलाच धडा मिळाला आहे. त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या फाशीमुळे देशभर आनंद आहे. अनेक ठिकाणी होळी साजरी केली जात आहे. ही न्यायाची होळी आहे, असेही निर्भयाच्या वडील म्हणाले.
previous post
next post

