Pune City News :- महाराष्ट्र राज्यामध्ये 31 मार्चपर्यंत कोणत्याही परदेशी विमानांना उतरण्यास बंदी लागू केली आहे.
राज्यामधील राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसही 31 मार्चपर्यंत बंद ठेवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. केंद्र सरकारनेही 31 मार्चपर्यंत सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.
परराज्यातील लोकांना महाराष्ट्रात येणे किंवा बाहेर जाणे अवघड होणार आहे. राज्य व केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवरुन महाराष्ट्राने करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्वत:च विलगीकरणामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
previous post
next post

