Pune City News:- कोरोना विषाणू ने देशातही हाहाकार उडवल्याने करोनाला पायबंद घालण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता यावी म्हणून आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे.
आज सकाळी पासून भारताच्या तमाम जनतेने ‘जनता कर्फ्यू’ संचारबंदी पाळला आहे देश कोरोना विषाणूमुक्त होण्यासाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान द्यायचं आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईत मध्यरात्रीपासून सामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा बंद करण्यात आल्या आहेत तर महाराष्ट्रासह तेलंगण, गुजरात मध्यप्रदेश आदी आठ राज्यांच्या आंतरराज्य एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
गो एअर त्यांच्या सर्व सेवा बंद ठेवले. अन्य कंपन्याही काही उड्डाणे रद्द केल्या. तसेच राज्यातील सर्वच शहरातील बाजार पेठाही बंद आहेत.

