Pune City News:- कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपुर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने लॉकडाऊन असल्यामुळे पोटभरन्याचे मोठे संकट उदभवलेल्या गोरगरीब व मजूर लोकांचे अन्न पाण्यावाचून हाल होऊ नये यासाठी “रिजनल खिरश्चन सोसायटी” च्या वतीने दापोडी मध्ये धान्यवाटप करण्यात आले.गहू, तांदळ आदी जीवनावश्यक धान्य वाटपासाठी सोसायटीचे प्रदेशाध्यक्ष ब्र नितीन रतन गायकवाड यांनी पुढाकार घेतला.सचिन चोपडे,पिटर गायकवाड ,जॉन सर यांच्या सहकार्याने गायकवाड यांनी गरजवंत कुटूंबांना धान्य देऊन मदतीचा हात पुढे केला.

previous post


