Pune City News
महाराष्ट्र

सरकारच्या उपाययोजनांची घोषणा कागदावरच…

PUNE CITY NEWS :- राज्य सरकारने ज्या उपाययोजना केल्याची घोषणा केली त्या घोषणा कागदावरच असून प्रत्यक्षात कुठेही मदत मिळालेली नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुनःश्च हरीओम, मिशन बिगिन अगेन या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांमुळे गोंधळ वाढला असून गरज पडली तर लॉकडाउन करावा लागेल हे सर्व गोंधळात टाकणार आहे.

याउलट असे सांगावे कि आम्ही जे सुरु करणार आहोत त्यात कितीही संकटे आली तरी त्याचा सामना आम्ही करूं.

मंत्र्यांना कोरोना झाला ही दु्र्दैवी बाब असून त्यांना आराम मिळो ही प्रार्थनाच करतो. पण मुंबईची परिस्थितीही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राला कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण मिळवावे लागेल. यामध्ये काय उपाययोजना येतील त्याचे नियोजन करावे, असे मत फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Related posts

सीमा म्हणजे आरएसएसची शाखा आहे का ?

Vishal Khandagale

निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय: अजित पवारांची टीका

Vishal Khandagale

पुण्यात रात्री २ वाजता “अग्नीतांडव”

Vishal Khandagale

Leave a Comment