Pune City News
महाराष्ट्र

मंदिरं बंद का ?; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

raj thakre

महाराष्ट्रात अनलॉक 4.0 मध्ये ठाकरे सरकारनं काही सवलती देत हॉटेल्स आणि मॉल खुली करण्याची परवानगी दिली आहे.

👉 मात्र अद्याप मंदिरांना परवानगी देण्यात आलेली नाही आहे. यावरून गेल्या काही दिवसांपासून सरकारवर टीका केली जात आहे.

🚩 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आता पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची कानउघडणी केली आहे.

राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं :

▪️ सध्या राज्य सरकारचं काही बाबतीतील धोरण शैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे.

▪️ ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये.

▪️ तसेच, ‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत.

▪️ सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे, आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का?

▪️ कोरोनामुळे जेंव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते तेंव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही देखील समर्थन केलं होतं.

▪️ पण आज जेंव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमकं महाराष्ट्रातच देवळं का बंद ठेवली जात आहेत?

▪️ जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथिल करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच चौकट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या.

Related posts

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांशी संवाद साधला

Vishal Khandagale

हा युद्धाचा भोंगा : उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

आज रात्रीपासून असणार विकेंड लॉकडाऊन

Vishal Khandagale

Leave a Comment