Pune City News :- कोरोना’चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून केली आहे.
केंद्र सरकारकडे महाराष्ट्राची 16 हजार 654 कोटी रुपयांची थकबाकी आहे. 31 मार्चपर्यंत ही थकबाकी मिळावी, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि प्रकाश जावडेकर यांनी अधिक लक्ष घालावे याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे मुळे राज्यशासनाला ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
अशावेळी केंद्र सरकारने आर्थिक मदत करण्याची गरज आहे, अशी मागणी राज्याकडून होत आहे.
previous post
next post

