सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे.
▪️ तसेच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचेही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे.
▪️ दरम्यान, राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
▪️ राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.


