राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध घातले असून सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, मात्र नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुखमंत्री म्हणाले :
▪️ राज्यात आताची परिस्थिती विचित्र असून कोरोनाचे हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे.
▪️ कोणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी आमची इच्छा नव्हती. या आधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो.
▪️ फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये बेडसची संख्या सात आठ हजार होती.
▪️ ही संख्या आता पण पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे. जंम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही राज्याने केली नसेल अशा सुविधा निर्माण केल्या.
▪️ मात्र, या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. लसीकरण सुरु झाले. पण लसींचा साठाही आता संपून जाणार आहे.
▪️ आपली लसीकरणाची गती मोठ्याप्रमाणात वाढवली आहे. पंचवीस वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. पण ती नाकारण्यात आली.
▪️ आपल्या मागणीवरून आता 45 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे. पण लसीचा साठा संपू लागला आहे.
▪️ दरम्यान, लक्षण नसलेल्यांची संख्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

