
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
–
–
महाराष्ट्रातील ११ कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमी प्रमाणात लक्षणे, त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे.
–
राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत.
–
परदेशातून प्रवास करुन आलेल्या प्रवाशांनी १४ दिवसांपर्यंत घरीच थांबावे.
–
परदेशी गेलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे.
–
जी मुख्य शहरे आहेत तेथील टुर ऑपरेटर्सनी शहरातील परदेशी गेलेल्या पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी.
–
कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत म्हणून नागरिकांनी घाबरुन तपासणीसाठी रांगा लावू नये, अधिकची खबरदारी घ्यावी.
–
चाचणी करण्याची सुविधा केंद्र शासनाच्या मान्यतेने केली जाते त्यामुळे केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर प्रयोगशाळेला मंजुरी दिली जाईल.
–
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव अजोय मेहता यावेळी उपस्थित होते.
previous post

