पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
आंबेडकर म्हणाले :
▪️ मोदी सरकारला किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला हे ठाऊक नाही.
▪️ तसेच डॉक्टरांपैकी किती डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला याचीही माहिती मोदी सरकारकडे नाही.
▪️ अशा स्वार्थी नेत्याचा आम्ही निषेध करतो. अशा स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनातं मोदी सरकारकडून या दोन प्रश्नांवर उत्तर माहित नाही असं देण्यात आलं होतं त्यानंतर आंबेडकरांनी टीका केली आहे.

