संत तुकाराम बीजच्या पार्श्वभूमीवर देहूगावात वारकऱ्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी करत जवळपास दीडशेहून अधिक वारकऱ्यांनी बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली देहू गावच्या वेशीवर भजन आंदोलन केले.
मात्र पोलिसांनी वारकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रशासनाकडून तुकाराम बिजेनिमित फक्त ५० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून वारकरी देहूनगरीत दाखल झाले आहेत. या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत देहू गावाच्या वेशीवर आंदोलन केले.

