हाथरस सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्यावतीने पाच प्रश्न मोदी सरकारला केले आहेत.
हाथरसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारवर प्रचंड टीका होते आहे. तसेच भाजपावर टीका होते आहे.
पाच प्रश्न :
1️⃣ सुप्रीम कोर्टातर्फे संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.
2️⃣ हाथरसच्या DM ना निलंबित केलं जावं, कोणतंही मोठं पद दिलं जाऊ नये.
3️⃣ आमच्या मुलीच्या मृतदेहावर आमची संमती न घेता पेट्रोल टाकून जाळण्यात का आला?
4️⃣ आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला धमकावलं का जातंय?
5️⃣ आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल आणले, पण आम्ही कसे मान्य करायचे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?

