अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त भागाशी केल्यामुळे वाद पेटला आहे.
शिवसेनेनं राज्यभरात कंगनाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले आहे. पण, आता जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर विचार करू अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.
मुंबई शहराबाबतच्या बेताल वक्तव्यावरून अनेकांनी कंगनाला सुनावलं आहे. तर काहींनी तिला पाठिंबा देखील दर्शवला आहे.
कंगनाने मुंबईबद्दल वक्तव्य करण्याची हिंमत केली. हेच तिने अहमदाबादबद्दल बोलून दाखवावे, असा सणसणीत टोलाही राऊत यांनी कंगनाला लगावला.

