राज्यातील शाळा सुरू करण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय राज्य सरकारनं अद्याप घेतलेला नाही. सध्या ऑनलाइन शिक्षण शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल जातं आहे. मात्र फीसाठी शाळा तगादा लावला जात आहे, असा आरोप पुणे पँरेंटस असोसिएशनच्या वतीने केला जात आहे.
शाळांची फी च्या संदर्भातली मनमानी थांबवावी , कारण फी भरलं नसल्याच्या कारणानं अनेक शाळा या ऑनलाइन क्लासेस बंद करत असल्याचे स्थिती आहे. तरी राज्य सरकारने फी बाबत अध्यादेश काढावा, या मागणीसाठी पुण्यातल्या बालगंधर्व चौकात पालकांनी साखळी आंदोलन केले.
राज्य सरकारने फी च्या संदर्भात अध्यादेश काढण्याची मागणी या आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

