Pune City News:- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले :
▪ केवळ जीवनावश्यक वस्तू चालू राहतील. अन्नधान्य, औषधं, बेकरी, पशूखाद्य, पाळीव प्राणी दवाखाने सुरु राहतील.
▪ त्यासंबंधीची वाहतूक सुरु राहील. तसेच कृषी उद्योगाशी संबंधित दुकाने आणि वाहतूक सुरुच राहील. सांगूनही काही जण ऐकत नाहीत ते दुर्दैवी आहे.
▪ राज्यातील सर्व मंदिरंं, प्रार्थनास्थळ बंद ठेवावी. मंदिरांमध्ये केवळ पुजारी, मौलवी असतील. त्याशिवाय रेल्वे, बस आणि खासगी वाहनेही बंद करण्यात येणार आहे.
▪ जर आवश्यकता असेल तर चालक अधिक 2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी सर्व खासगी वाहनाला दिली आहे.
▪ बस, खासगी वाहनेही बंद, जर आवश्यकता असेल तर चालक अधिक 2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी आहे.
▪ वैद्यकीय क्षेत्रात स्टाफची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षित करुन या सेवेसाठी तयार करणार आहे.
▪ सध्या कोरोनाच्या निर्णयाक टप्प्यावर आलो आहे. हीच ती वेळ आहे आता रोखू शकलो नाही तर जगभर थैमान घातलं आहे, तसंच ते महाराष्ट्रात घालेल.

