Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

महाराष्ट्रात संचारबंदी लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील

Pune City News:- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले :

▪ केवळ जीवनावश्यक वस्तू चालू राहतील. अन्नधान्य, औषधं, बेकरी, पशूखाद्य, पाळीव प्राणी दवाखाने सुरु राहतील.

▪ त्यासंबंधीची वाहतूक सुरु राहील. तसेच कृषी उद्योगाशी संबंधित दुकाने आणि वाहतूक सुरुच राहील. सांगूनही काही जण ऐकत नाहीत ते दुर्दैवी आहे.

▪ राज्यातील सर्व मंदिरंं, प्रार्थनास्थळ बंद ठेवावी. मंदिरांमध्ये केवळ पुजारी, मौलवी असतील. त्याशिवाय रेल्वे, बस आणि खासगी वाहनेही बंद करण्यात येणार आहे.

▪ जर आवश्यकता असेल तर चालक अधिक 2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी सर्व खासगी वाहनाला दिली आहे.

▪ बस, खासगी वाहनेही बंद, जर आवश्यकता असेल तर चालक अधिक 2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी आहे.

▪ वैद्यकीय क्षेत्रात स्टाफची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षित करुन या सेवेसाठी तयार करणार आहे.

▪ सध्या कोरोनाच्या निर्णयाक टप्प्यावर आलो आहे. हीच ती वेळ आहे आता रोखू शकलो नाही तर जगभर थैमान घातलं आहे, तसंच ते महाराष्ट्रात घालेल.

Related posts

10,000 हजार गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व धान्याचे वाटप: नगरसेवक उमेश गायकवाड

Vishal Khandagale

कोरोना : कामगारांच्या EMI समायोजित करण्यासाठी; कामगार नेत्यांचे पंतप्रधानांना पत्र !

Vishal Khandagale

‘प्रोजेक्ट प्लॅटिना’; जगातील पहिले राज्य ठरणार महाराष्ट्र

Vishal Khandagale

Leave a Comment