Pune City News:- कोरोनाने थैमान घातलेल्या इराणमधून 234 भारतीय मायदेशात दाखल झाले आहेत. त्यात 131 विद्यार्थी आणि 103 यात्रेकरू आहेत.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराण सरकार व तेथील भारतीय दुतावासाचे आभार मानले आहेत. इराणहून भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत आले. त्यानंतर ते जैसलमेरला रवाना करण्यात आले.
इराणमधून आलेल्या नागरिकांची प्रथम तपासणी केली जाणार आहे. जैसलमेरमधील लष्कराच्या स्वतंत्र कक्षात सर्वांची करोनाची तपासणी करूनच त्यांना सोडले जाणार आहे.
previous post

