कोरोनामुळे सर्व सण हे अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी साजरे होताना दिसत आहे. अशातच बकरी ईद देखील साधेपणाने साजरी करावी असे आवाहन सरकारने केले होते.
दरम्यान, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनंतर बोकड्याच्या कुर्बानीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
राज्य सरकारने कुर्बानीवर कोणतीही बंदी घातलेली नाही. तसेच बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही. ज्यांनी बकरी ऑनलाईन बुक केली असेल. त्यांनाही बकरी मिळेल,’ असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

