PUNE CITY NEWS:- कोरोनामुळे शाळा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. तर ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याची काही गरज नव्हती.
कारण यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे अमरावतीत बोलत होते.
त्याशिवाय, उन्हाळ्याची सुट्टी रद्द करुन, जानेवारी महिन्यापासून शाळा सुरु करण्यात याव्यात, असा प्रस्ताव मुख्यंमंत्र्याना दिल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
बच्चू कडू म्हणाले :
▪️ कोरोनामुळे शाळा अद्यापही सुरु झाल्या नाहीत. तर ऑनलाइन शिक्षण चालू करण्याची काही गरज नव्हती. कारण, यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते.
▪️ शिक्षण हे सार्वत्रिक असलं पाहिजे, सर्वांना समान मिळालं पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यातून विषमता निर्माण होऊ नये.
▪️ आमच्या बैठका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत या संदर्भात पाच ते सहा वेळा झाल्या आहेत.

