Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

टाळ्या, दिव्यांनी कोरोना पळणार नाही; राहुल गांधी

Pune City News :- देशात कोरोना विषाणू विरोधात सुरू असलेले प्रयत्न तोकडे आहेत,असं म्हणत काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. टाळ्या वाजवून,दिवे आणि टॉर्च पेटवून कोरोना पळणार नाही, असं राहुल गांधी यांनी ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात 22 मार्चला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. यात आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या सर्व कर्मचारी आणि संस्थांचे आभार मानण्यासाठी मोदींनी हे आवाहन केलं होतं.यानंतर उद्या रात्री म्हणजे 5 एप्रिलला 9 वाजात 9 मिनिटं घरातील लाइट बंद करून नागरिकांनी मेणबत्ती, मोबाइलचा प्लॅश लाइट, टॉर्च किंवा दिवे पेटवण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

Related posts

पहिली ते आठवीचे विद्यार्थी परीक्षाविना थेट पास होणार

Vishal Khandagale

अटींसह मर्यादित उद्योग सुरू करण्यास परवानगी !

Vishal Khandagale

चीनकडून जागतिक व्यवसायावर ताबा; जगातील मोठ्या कंपन्यांची खरेदी केली हिस्सेदारी !

Vishal Khandagale

Leave a Comment