Pune City News:- लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम,ओरीसा व पश्चिम बंगाल या राज्यामधील १ लाख ८८ हजार ५७० प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून २६ मे २२० अखेर १४१ विशेष रेल्वेगाड्या रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागातून मध्यप्रदेश १५, उत्तरप्रदेश ६१, उत्तराखंड २, तामिळनाडू २, राजस्थान ५ , बिहार ३५ , हिमाचल प्र।देशसाठी १ , झारखंडसाठी ६, छत्तीसगडसाठी ६, जम्मू आणि काश्मिर साठी १, मणिपूरसाठी १, आसामसाठी १, ओरीसासाठी २ व पश्चिम बंगालसाठी ४ अशा एकूण १४१ रेल्वेगाडया १ लाख ८८ हजार ५७० प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत.

