जे महाराष्ट्रात घडलं नाही, ते बिहारमध्ये घडवून आणू, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला, भविष्यात असा प्रयत्न परत करु. असंही ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
▪️ बिहारमध्ये मुस्लिम, मागासवर्गीय व आदिवासी मिळून 40 टक्के समाज आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र आल्यावर कोणत्याही सरकारला पाडण्याची ताकद यांच्यामध्ये आहे.
▪️ शिवाय हे सरकार नागरिकता, आरक्षण यांच्या विरोधात आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ.
‘वंचित’च्या प्रयोगातून महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवत प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आता बिहार निवडणुकीसाठी एल्गार पुकारला आहे.

