गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचा गृहमंत्री पदाचा कारभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
▪️ गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.
▪️ पत्रामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्याची विनंती करण्यात आली.
▪️ तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत पत्रात विनंती करण्यात आली आहे.
▪️ दरम्यान, गृहमंत्रीपदासाठी राज्यातील अनेक नेत्यांची नावे चर्चेत आली होती, अखेर राज्य सरकारकडून दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

