महाराष्ट्रात उद्भवलेली कोरोनाची स्थिती यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित केलं.
मुख्यमंत्री :
● कोरोनाचा शिरकाव होऊन वर्ष पूर्ण झालं. मधल्या काळात या कोरोनाला रोखण्यास आपण यशस्वी झालो होतो.
● पण लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाल्याने कोरोना वाढला.
● राज्यात रोज अडीच लाख चाचण्या करणार आहे. तर केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार चाचण्या होणार आहेत.
● ७० % RTPCR चाचण्या करण्यात येणार आहेत. तर राज्यात लॉकडाउनची स्थिती अजूनही टळलेली नाही.
● आज राज्यात ४५ हजार कोरोना रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही.
● राज्यात कडक निर्बंध लावावे लागतील, त्याबाबत उद्या परवा जाहीर करु. गर्दी टाळावी लागेल, ऑफिसेसना नियमावली हवी.
● तर बसना नियम, रेल्वे, बस तुडुंब आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली तर ब्राझीलसारखा शुकशुकाट दिसेल.
● रोजगारही गेला आणि जीवही गेला. तसं होऊ नये. दोन – तीन दिवसात मी पुन्हा बोलेन.
● मी तज्ज्ञांशी बोलेन, मला पर्याय सांगा, लॉकडाऊन पर्याय नाही मान्य, मग करायचं काय जरुर सांगा.

