मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, ३० एप्रिल शुक्रवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. राज्यातील कोरोना परिस्थितीच्या संदर्भात उद्धव ठाकरे कोणती महत्वाची घोषणा करणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
उद्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना रोखण्यासाठी केले जाणारे उपाय, लसीकरण या संदर्भात उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे.

