महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही, परीक्षा झाली तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागणार असल्याचा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिला.
- तसेच मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकारने फसवल्याचा आरोप खासदार संभाजीराजे यांनी केला आहे.
- राज्य सरकार हातात असणाऱ्या गोष्टीही का करत नाही? मराठा समाजाला सरकारने फसवलं आहे.
- सारथी ही संस्थाही सरकारने बुडीत खाती घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं?
- दरम्यान, सरकारनं सर्वांना सोबत घेऊन चालावे, अशी माझी सरकारला सूचना असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

