राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करून आपल्या भाषणाला सुरूवात केली.
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” हा देशातील अभिनव उपक्रम ठरला आहे.
कोरोना विरोधातील लढाऊ सुरू असून राज्य सरकारने आता मी जबाबदार योजना सुरू केली आहे,” असे म्हणत राज्यपालांनी राज्य सरकारचे कौतुक केले.
“धारावी सारख्या परिसरात राज्य शासनाने प्रभावीपणे काम केले. राज्य सरकारने कोरोनासंबंधी मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केले.
“औद्योगिक मंदीतही राज्य सरकारने चांगले काम केले आहे. रोजगार मिळणे सोपे होण्यासाठी महारोजगार व महाजॉब्ज पोर्टल सुरू केले.
“माझं शासन कर्नाटक महाराष्ट्र वादाबद्दल सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडत आहे. मराठी भाषिकांना न्यायासाठी काम करत आहे,” असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

