राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली असून ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला अधिवेशन घेणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ३ ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुरवण्या मागण्यांसाठी एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून अधिवेशन फक्त चार दिवस चालणार असल्याचे सांगितलं जात आहे.

