स्थलांतरित मजुरांबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का ? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले :
▪️ स्थलांतरित मजुरांची कुठेही नोंद नसून त्यांची कोणत्याही प्रकारची व्यवस्था झालेली नाही, त्यांना जेवणही मिळाले नाही.
▪️ त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था सरकारने उभी केली नसल्याचे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आले आहे.
▪️ सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुप्रीम कोर्टाने इतर कुठल्याही राज्यांवर ताशेरे ओढले नसून फक्त महाराष्ट्रावर ताशेरे आहेत.
दरम्यान, एखादा मुद्दा विरोधी पक्षाने चांगल्यासाठी मांडला तर सरकारने कारवाई केली पाहिजे, तसे न झाल्याने सुप्रीम कोर्टाने चपराक दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

