Pune City News :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 3 मे नंतर निर्बंध शिथील करण्याचे संकेत दिले.
विशिष्ट भागातील परिस्थिती पाहून 3 मे नंतर आम्ही निश्चित निर्बंध शिथील करु, पण जनतेला त्यांनी सावध राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
▪️ ‘आपण सावध राहून सहकार्य केले नाही तर, मागच्या काही दिवसात आपण जे साध्य केले आहे, ते गमावू शकतो’,
▪️ ‘सावध आणि संयम राखून आपण पुढे जाऊ’. “जनतेने कोरोना व्हायरसची भिती मनामध्ये बाळगू नये. फक्त वेळेत उपचार होणे आवश्यक आहे.
▪️ काही दिवसांच्या बाळापासून ते 83 वर्षाच्या वृद्धापर्यंत कोरोनामधून बरे होऊन लोक घरी गेले आहेत. व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण सुद्धा कोरोनामधून बरे झाले आहेत”.लॉकडाउनचा दुसरा टप्पा येत्या 3 मे रोजी संपणार आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री काय घोषणा करतात? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

