महाराष्ट्र राज्यातील शाळा आता 21 सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्र्यांनी नुकतीच दिली आहे.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली होती.
मात्र राज्यात या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नोव्हेंबर महिन्याची वाट पहावी लागणार आहे.
कारण राज्यातील शाळा ह्या दिवाळीनंतरच सुरु होणार असल्याचे शिक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील कोरोनास्थिती लक्षात घेता सध्या तरी राज्यातील शाळा प्रत्यक्ष उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थाचालकांनी बैठकीत घेतल्याचे समजते.

