श्रम कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातील तीन महत्वाच्या विधेयकांना संसदेत मंजुरी मिळाली आहे. तीनही विधेयकांत असंघटित क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
यामध्ये ईएसआयसी अधिकांश कर्मचाऱ्यांना आरोग्य संरक्षणाचा अधिकार देण्याचा प्रयत्न केला असून ही सुविधा आता सर्व 740 जिल्ह्यांत उपलब्ध करण्यात येणार आहे.
याशिवाय धोकादायक काम असलेल्या संस्थेला, कंपनीला ईएसआयसीशी कनेक्ट होणे बंधनकारक असणार आहे. तसेच कामगारांना नियुक्ती पत्र मिळवण्याचा कायदेशीर अधिकार देण्यात आला.
दरम्यान, विशिष्ट वयापेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांची वर्षातून एकदा निःशुल्क आरोग्य तपासणी करणे कंपनीला बंधनकारक असणार आहे.

