Pune City News
राष्ट्रीय

शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार

कृषी विधेयका विरोधात सुरु असलेलं आपलं आंदोलन शेतकऱ्यांनी आता 02 ऑक्टोबरपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच 01 ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी देशव्यापी रेलरोकोची हाक दिली आहे.

सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी विधेयकांविरोधात राज्यातील वेगवेगळ्या भागांत शेतकरी आंदोलनं सुरु आहेत.

पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रेलरोकोचा आजचा पाचवा दिवस आहे. तसेच या शेतकऱ्यांनी आंदोलन दोन ऑक्टोबरपर्यंत वाढवल्याची घोषणाही केली आहे.

तसेच उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगाना, गुजरात, गोवा, ओडिशा आणि तमिळनाडु मध्येही शेतकऱ्यांसोबतच काँग्रेस आणि विरोधी पक्षही आंदोलनात सहभागी झाले आहेत.

दरम्यान, हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांना मिळालेली देहदंडाची शिक्षा आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

Related posts

आरक्षणाचा अर्थ मेरिट नाकारणं असा नव्हे : सर्वोच्च न्यायालय

Vishal Khandagale

विश्वनाथन आनंद ‘येथे’ अडकले!

Vishal Khandagale

पाकिस्तानने भारताची ‘ही’ मागणी केली मान्य

Vishal Khandagale

Leave a Comment