कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
कोरोनामुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
जर अशी परिस्थिती उद्भवली
● विद्यार्थी कोरोनाबाधित असेल
● विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील
● विद्यार्थी राहत असलेला विभाग सील केला असेल
तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी तसेच बारावीची परीक्षा देता येणार नाही.
या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

