दहावी, बारावी परीक्षांसंदर्भात उद्या (दि.6) महत्त्वाची बैठक होणार आहे. कडक निर्बंधांदरम्यान परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने घेतल्या जाणार यावर चर्चा होणार आहे.
● दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
● शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर ही बैठक होणार आहे. राज्यात कडक निर्बंध लागू झाल्यानंतर परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची यावर चर्चा होणार आहे.
● दरम्यान शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे होणार्या परीक्षांचे काय होणार यावरही चर्चा केली जाणार आहे.

