मुंबई मेट्रो-3 च्या कांजूरमार्ग मधल्या कारशेडच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे.
कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
उद्धव ठाकरे सरकारने कांजुरमार्गची ही जागा राज्य सरकारच्या मालकीची असल्याचं सांगत ऑक्टोबरमध्ये मेट्रोसाठी हस्तांतरित केली होती.
ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर काही खासगी व्यक्तींनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आता अंतिम सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे.

