Pune City News:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.
राज्यात आज (23 ऑगस्ट) दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून थेट समुद्रात मूर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
तसेच गणेश मूर्तींचे संकलन करा, अशा सूचना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवातील पहिला विसर्जन सोहळा आज पार पडणार आहे.
अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसांच्या गणपतीचे काल आगमन झाले. त्यानंतर आज दुपारनंतर दीड दिवस पूर्ण झाल्यानंतर गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाईल.

