Pune City News:- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र नववी व अकरावीच्या परीक्षेबाबतचा निर्णय 14 एप्रिलनंतर निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ज्याप्रमाणे इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरातील सर्वंकष मूल्यमानाच्या गुणांच्या आधारे सरासरी गुण देऊन पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे राज्य सरकारनेही निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.
previous post

