राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले :
▪️ राज्यातील काही भागांत कोरोनाबाधितांची संख्या घटत असून ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
▪️ राज्यात आज कोरोनाची रुग्णसंख्या 18 हजारांवर आली आहे. मात्र, पहिल्या लाटेतील ही संख्या सर्वोच्च होती.
▪️ ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे गरजेचं आहे.
▪️ कोरोनाच्या परिस्थितीत आता फरक दिसत आहे. परंतु, कोरोनाची आकडेवारी हवी तशी खाली आलेली नाही.
▪️ रुग्णसंख्या कमी होत चालली असली तरी मागील वेळी सर्वोच्च संख्येच्या जवळ आपण आता आलो आहोत.
▪️ दुसर्या लाटेतला विषाणू झपाट्याने पसरतो आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन नाही परंतु निर्बंध कायम राहणार आहेत.
▪️ राज्यात म्युकरमायकोसीसचा धोका वाढतोय. बुरशीच्या नव्या आजारावर टास्कफोर्स काम करत आहे.
▪️ कोरोनाचे नवे स्ट्रेन अधिक घातक आहे, खबरदारी घेतली नाही तर तिसरी लाट येऊ शकते.
▪️ किनारपट्टीवर नव्या उपाययोजना करणार असून तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना लवकरच मदत दिली जाणार आहे.
▪️ दरम्यान, काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही वाढत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

